आपलं यश डोळे भरून बघणारी माणसं हवीत...

आपलं यश डोळे भरून...
बघणारी माणसं हवीत......

दुसऱ्या साठी करताना सुद्धा ........ 
आपल्याला झेपेल इतकंच करावं..
अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना .....
अनेकांसाठी बरंच काही करतो..झटतो.........  
प्रत्येक वेळी आपलीच जबाबदारी म्हणून...... 
कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो....
कोणताही स्वार्थ नसतांना.. 
मतप्रवाह तर दोन्ही बाजूंनी असतात..... 
ज्याच्यासाठी करतो त्याला वाटतं ........ 
केलं आमच्यासाठी तर काय फरक पडतो..
त्यांचं कर्तव्यच आहे..

करणाऱ्याचा हेतू स्वच्छ असतो.. 
आपल्या प्रयत्नाने कुणाचं तरी भलं व्हावं.....  
हा निर्मळ प्रयत्न असतो......... 
गैरसमज हा फार मोठा शत्रू असतो....... 
तो या निर्मळ भावनेलाच धोका निर्माण करतो...

ज्याला समजून घ्यायचंय ...... 
तो समजूतदारपणे गोष्टी हाताळतो...
ज्याला समजून घ्यायच॔च नाही ...... 
तो शब्दाचा किस पाडतो...
शब्दांनी घायाळ करतो...

नात्यांची खरी मेख तर इथेच आहे...
माझं माझं करता करता ...... 
आपण आपल्यांना दुखावतो........ 
घालून पाडून बोलतो.......... .
परिणाम फक्त वाईटच होतात...
संबंध दुरावले जातात..... 
आपुलकीतला रस संपत जातो...
उरते ती फक्त निराशा...

हल्ली तर नाती आर्थिकदृष्टीतच बांधलेली दिसतात..
जणू पैसा म्हणजे सर्वस्व...
अमक्याने अमक्या कार्यक्रमात ....... 
आहेर दिला नाही म्हणून राग...
रस्त्याने जाताना ओळखीचे बोलले नाही हा राग...
एखाद्या प्रसंगांत मागे उभे राहिले नाही म्हणून राग...

निर्व्याज प्रेम .. जिव्हाळा.. काळजी.. कुटुंबातील प्रेम 
हे सगळंच विरळ होत चाललंय ...

एकमेकांना टाळ्या देत हास्याची कारंजी उडणं लुप्त होतंय...

खरं बघितलं तर किती दिवस आपण जगणार .... 
याची काहीच शाश्वती नाही....... 
सोबतीला काय घेऊन जाणार हेही माहीत नाही....

जिव्हाळ्याची अगदी कमी माणसं असतात .... 
जी आपली काळजी करतात......... 
जीव ओतून आपल्याला घडवतात.. 
वेळप्रसंगी आपल्या भल्यासाठी रागावतात ..
पण परत माया करतात..
त्यांचा विसर कधीच पडू देऊ नये..

कोणाला व्यक्त होता येतं तर कोणाला नाही.. 
हा समजूतदारपणा अंगी यायला हवा..

जगण्यासाठी दिवस फार कमी आहेत.. 
तक्रारी मात्र त्यानंतर ही सुरूच असणार..

दुसऱ्याला दुःखी करून ....... 
आपण सुखी व्हावं ही भावना किती बोचरी आहे...

आयुष्य फक्त धावण्याची स्पर्धा नाही... 

मिळेल ते अनुभव ..
मिळेल ती उपेक्षा ..
मिळेल ते प्रेम... आदर.. 
मिळेल ती अनुभूती घ्यावी... 

प्रवाहात मुक्त जगावं.. 
जीवनात सगळेच रंग हवेत... 
निराशेतही आशा आहेच की... 
त्या ऊर्जेची वाट बघायची..

कोणा वाचून कोणाचं अडत नसतंच खरं तर..
पण ....... 
आनंद मात्र घेता येत नाही तो आपल्या माणसांशीवाय...

कौतुक करणारं..
पाठीवर हात ठेवणार कुणीतरी हवंच ना....

आपल्या दुःखाच्या प्रसंगी डोळ्यात अश्रू येणारी... 
आपलं यश डोळे भरून बघणारी ....... 
माणसं ही हवीतच अवतीभवती... 

नाहीतर यश .. पैसा खूप मिळवला ....
पण ........... 
माणसंच नसतील प्रेम करणारी 
तर त्या सारखा दरिद्री तोच...खरं ना..??....

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

आपली सहल खूप छोटी आहे ... Short Tour

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे