पोस्ट्स

◾व्यवसाय मंत्र :- रु.२०,०००/- वीस हजार

इमेज
रु.२०,०००/- वीस हजार हल्लीची तरुण मुलं आई वडिलांकडे २० हजार कशासाठी मागतील तर लेटेस्ट मोबाइल खरेदी करण्यासाठी.  १८ वर्षाच्या सुनील मित्तलनेही आपल्या वडिलांकडे २० हजार मागितले.  कशासाठी तर व्यवसाय करण्यासाठी.  सायकलचे स्पेअर पार्टस बनविण्याचा व्यवसाय त्याने सुरूही केला, आणि एक दिवस सुनील मित्तलने मोबाइल क्षेत्रात "एअरटेल" नावाने ५० हजार कोटींचं साम्राज्य उभं केलं. कारण त्याच्याकडे होती भव्य स्वप्न. त्याच्यासमोर आदर्श होता धीरूभाई अंबानींचा.  आपणही अशीच झेप घ्यायला हवी ह्या ध्येयाने प्रेरित झालेल्या सुनीलने मग डीझेल जनरेटर आयात करायचा परवाना मिळवला.  जपानच्या होंडा आणि सुझुकी ह्या बड्या कंपन्यांचे डीझेल जनरेटर तो आयात करू लागला.  धंद्यात चांगला जम बसला असं वाटत असतानाच अचानक भारत सरकारने डीझेल जनरेटर आयात करण्यार बंदी आणली आणि एका रात्रीत सुनील अक्षरशः बेकार झाला. आता काय करावं हा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला.  नवा उद्योग शोधण्यासाठी मग तो परदेशी गेला.  तैवानमध्ये एका औद्योगिक मेळाव्यात त्याने प्रथमच पुशबटन टेलिफोन पाहिले.  भारतात तेव्हा काळ्...

◾ललित लेख :- तिचं महत्त्व..👌

इमेज
👌 तिचं महत्त्व..👌 पती व पत्नी कायद्याने दोघे वेगळे झाल्यावर त्याने  राहतं घर विकायला काढलं. ब्रोकरच्या थ्रू तिच्या वडिलानीच ते घर  विकत घेतलं......पून्हा घराची  एक किल्ली त्याच्या हातात देत म्हणाले...  'मी माझ्या लेकीला ओळखतो ..... तसा तुलाही.. ...सगळ्या गोष्टी  भावनेच्या भरात करतोस...  अगदी माझ्या लेकीशी लग्न सुद्धा...... पून्हा भावनेच्या भरात एकत्र यावसं वाटलं तर? तसं व्हायला नको... म्हणून ही रिकामी वास्तू तुझ्या हवाली करतो...... कधी वाटलं तर येऊन बसत जा..... "भरल्या घरा पेक्षा रिकामं घर जास्त बोलतं    आपल्याशी  भावनेपेक्षा विचार  जास्त ठाम असतात...... विचारांवर ठाम झालास  तर ...... घेतल्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही.. ... निर्णय ठाम झाला की माझी किल्ली मला परत दे. ..... नाहीतर येऊन माझी मुलगी परत घेऊन जा......' आणि खरच तो ढळत्या दुपारी रिकाम्या घरात  बसायला लागला...... कलंडणारी ऊन्ह  आपल्या घरात अशी ऐसपैस पसरतात  त्याला माहीतच नव्हतं... ...मावळतीचा वारा  अख्ख्या घराचा ताबा घेतो ..   .. याची त्या...

◾विशेष लेख :- स्वत: वर पण प्रेम करा....

इमेज
स्व त: वर प्रेम करा.... मागचा आठवडा आपण सर्वांनी प्रेमसप्ताह   म्हणुन साजरा केला . त्याच अनुषंगाने काही  विचार मांडण्याचा हा क्षुल्लक सा प्रयत्न आपण सगळ्यावर प्रेम करतो, नाही  का! आपलया  कुटुंबावर , मित्र मैत्रिणींवर, आपल्या  नोकर माणसावर , मुक्या प्राण्यावर आणि  झाड, वेली  फूलांवर देखील !😘😘 पण  बर्याच वेळा  स्वत:  वर प्रेम करायच विसरतो .या जगण्यावर या जन्मावर शतदा  प्रेम करावे..हे फक्त गाण्यात ऐकतो..  जगण्यावर  तेव्हाच प्रेम करु शकतो ना जेव्हा स्वत:वर करु!  स्वत:वर प्रेम करण हा  स्वार्थी विचार नक्कीच नाही.  आपण स्वत:वर वर  भरभरुन  प्रेम  करत नसू तर इतर कुणी तरी आपल्या  वर प्रेम कराव ही अपेक्षा च चुकीची ठरते. आणि  अशी व्यक्ती दुसर्या ला प्रेम ते काय  देणार!    आता स्वत: वर प्रेम करणे  म्हणजे नक्की काय? असा प्रश्न पडू शकतो.तर स्वत:च्या शरीराची  आणि  मनाची आपण  काळजी घ्यायला हवी. सर्वाना  आनंदी ठेवण्याच्या  अट्टाहासा  पायी आपण स्...

◾इतिहास :- तैमूर आला आणि घाबरून पळाला, तेही एका स्त्री ने पळवून लावले। खरा इतिहास

इमेज
तैमुर आला हे शिकवलं गेलं, पण तो घाबरून पळाला, हे आम्हाला कधीच शिकवलं गेलं नाही ..!! आता, नवीन शिक्षण पद्धतीमध्ये, आम्हाला आमचा 'खरा' इतिहास शिकवला जाईल ..!! वाचा ... समरकंद म्हणजेच सध्याचा उझबेकिस्तान .. तिथला क्रूर शासक तैमूर ..!! भारत जिंकून इथे धर्मप्रसार करावा या उद्देशाने तो भलंमोठं सैन्य घेऊन निघाला ..!!  अफगाणिस्तानातील गझनवी शासकांना त्याने हरवले. सर्वांना माहीतच आहे की, तो अत्यंत क्रूर, निर्दयी, दुष्ट होता ..!! त्याच तैमुरला, एका रणरागिणीने अक्षरश: जेरीस आणले होते ..!! ती होती रामप्यारीबाई चौहान ..!! तैमुर च्या अत्याचाराचे किस्से वाचून, कुणाचाही थरकाप उडेल ..!! अफगाणिस्तान चा प्रदेश जिंकून, हाच तैमुर, हरिद्वार, हरियाणा, दिल्लीच्या रोखानें, पंजाब उध्वस्त करून निघाला .. वाटेत येणाऱ्या लहान मोठ्या राजांनी प्रतिकार केला देखील .. पण, तैमुरच्या विशाल सेनेपुढे कुणाचाही टिकाव लागू शकला नाही ..!!  राजे महाराजे थकले तरी, भारतीय जनता मात्र हार मानणारी नव्हती ..!!  उत्तर भारतात त्याकाळी असणाऱ्या विविध जातींच्या प्रमुखांनी, देश धर्माच्या रक्षणासाठी एक समिती तयार केली ..!!...

◾ललित लेख :- प्रेमाचा खरा अर्थ

इमेज
❗🌸 प्रेमाचा खरा अर्थ 🌸❗  ❤️  प्रेम म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाकडे वेगवेगळे असू शकेल. माझे स्वतःचे असे मत आहे की खऱ्या प्रेमाचा अर्थ हा खूप व्यापक, सर्वदूर   सर्वसमावेशक, अनंत आहे. प्रेम म्हणजे जीवन आहे    ❤️ खरे प्रेम आपणाला समर्पण, त्याग, निष्ठा, स्वतःला पूर्णपणे  झोकून देणे, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता निरंतर कार्यरत राहणे शिकवते.  ❤️  प्रेम हे सर्व विश्वव्यापी, कणाकणात, सगळीकडे ओतप्रोत भरलेले असून त्याची प्रचिती आपल्याला नित्य येत असते परंतु आपणाला हेच प्रेम आहे  हेच समजत नाही.    ❤️  आजही  समाजात बऱ्याच लोकांनी प्रेमाची व्याख्या ही अत्यंत संकुचित व मर्यादित स्वरूपात आपल्याला  जशी  पाहिजे  तशी  केलेली आहे.   प्रेमाची व्याख्या करणे खूप अवघड आहे. शब्दांच्या चौकटीत आपण प्रेमाला बांधू शकत नाही. प्रेमाचा आवाका किंवा व्याप्ती प्रचंड मोठी आहे. माझे तर असे स्पष्ट मत आहे की  खूप जणांना अजून खरे प्रेम म्हणजे काय व प्रेमाची ताकद अद्यापही कळून, उमजून आलेली  नाही व...

◾ललित लेख :- सायकल

इमेज
नवीकोरी सायकल घेऊन पार्वती रिक्षातून खाली उतरली तशी दुर खेळत असलेली सायली धावतच तिच्या जवळ आली. "माझी नवी सायकल,माझी नवी सायकल" सायकलवरुन हात फिरवताफिरवता सायली उद्गारली. नवी सायकल पाहून तिचा छोटासा चेहरा आनंदाने एकदम फुलून आला होता.समोर जो दिसेल त्याला ती सायकल दाखवू लागली.पार्वती आपल्या लेकीकडे कौतुकाने पहात होती.लोकांची धुणीभांडी करुन साठवलेल्या रकमेतून तिनं लेकीचा हट्ट पुरवला होता.दोन वर्षांपूर्वी एका ट्रकवर क्लिनरचं काम करणारा तिचा नवरा अपघातात वारल्यानंतर मुलीसाठी तिनं काहीच केलं नव्हतं.सायलीनेही कधी हट्ट धरला नव्हता.  दुसऱ्या दिवसापासून पार्वती नाही नाही म्हणत असतांना सायली सायकल घेऊन शाळेत गेली.अर्थात सायकल घरी ठेवूनही तिचा काहीच उपयोग नव्हता.सात दिवस सगळं व्यवस्थित सुरु होतं.आठव्या दिवशी सायली रडत रडत घरी आली.पार्वतीने विचारल्यावर तिनं सायकल चोरीला गेल्याचं सागितलं.पार्वतीच्या काळजात धस्स झालं.पोटाला चिमटे देऊन साठवलेल्या पैशातून घेतलेल्या सायकलचं असं व्हावं या कल्पनेने तिला रडू कोसळलं.शेजारच्या मुलांना घेऊन तिनं शाळेत आणि इतरत्रही तिचा शोध घेतला पण सायकल काही मिळाली...

◾कविता :- कधी तू

इमेज
➖➖   कधी तू ➖➖ कधी तू...येशील परतून         सांगून मज जाशील का ? दिलंय वचन मीच तुला        येऊन जरा पाहशील का ? कधी तू...हळूच हलवून        झोपेतून उठवशील का ? निघून गेलेल्या क्षणांची      ती झलक दाखवशील का ? कधी तू...मला कुरवाळून       गुपीत तुझे सांगशील का ?  परत कधीच येत नसते       सत्य हे समजावशील का ? कधी तू...निघून गेलीस हळूच      विचार करून डोकं फिरलंय येशील कधीतरी याच आशेने      जगून घेण्याचं वारं शिरलंय        कधी तू...दिलीस हुलकावणी       ना कधी जाणली मी महती करता आलेल्या संधीचं सोनं       आनंदाश्रू नयनी या वाहती कधी तू...पुन्हा येण्याची       वाट पाहत नाही बसणार फुलवेन कष्टानं जीवनमळा       क्षणांनाच त्या लागेल लळा          क्षणांनाच त्या लागेल लळा ✍️ श्री.संग्राम कुमठेकर           मु.पो.कुमठा (बु.)   ...

◾कविता :- बहुरंगी देश...

इमेज
    बहुरंगी  देश जरी येथे असती सर्व धर्म  आम्ही राहतो राखूनी मान , सारे एकत्र नांदून म्हणतो  माझा भारत देश महान  ||१|| एकाच छताखाली सर्व जाती  आपुलकीचे गोड संवाद साधती,  चहूबाजूंनी देखणा निसर्ग वसती  बहुभाषिकतेचा येथे मेळ साधती ||२|| हिरवळीने सजलेला माझा देश  विविध रुप परिधान करी वेश , छाती फुगवून सांगतो आम्ही  प्राणाहून प्रिय माझा भारत देश ||३|| बर्फाच्छादित पर्वत लक्ष वेधून  पवित्र गंगेचा आहे  निवारा,  तेथे उंच हिमालय देती पहारा  शत्रूला वाटे त्याचा किती दरारा| |४||  सदैव भूमातेची शपथ घेऊनी तयार सैनिक देशरक्षणासाठी,  हसतमुखी करी प्राण बलिदान  वीरजवान प्रेरणा देई आम्हासाठी ||५|| स्वर्गाहून सुंदर माझा देश  विविधतेत एकता हीच शान , अन एकमुखाने रोजच बोला हा माझा भारत देश महान ||६|| 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩  श्रीम. सुषमा सुनिल जाधव    जि. पुणे फोन नंबर = 9552003581   असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे   YouTube   चैनल   सबस्क्राईब   करा दररोज प...

◾विशेष लेख :- शिवाजी राजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व!

इमेज
शिवाजी राजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व!      इतिहासात आपण पाहिलंच असेल की सर्व साधारणपणे बरेच राजे महाराजे हे वंश परंपरागत पद्धतीने किंवा कटकारस्थान करून राज गादीवर विराजमान झाले आहेत. आता त्यांचा हेतू हा खरंच लोककल्याणाचा होता की फक्त अधिसत्ता गाजवण्याचा होता हा एक चिंतनाचा विषय आहे. कारण असे किती राजे आले आणि गेले पण माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच आहेत असं मला वाटतं.त्या पैकीच एक नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! कारण त्यांनी लोकांच्या हृदयात त्यांचं अढळ असं स्थान निर्माण केलं आहे जे त्यांच्या अद्वितीय कर्तबगारीचं प्रतिक आहे. काय होती ही कर्तबगारी व कशाच्या आधारावर होती? याचं विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केला आहे.     शिवाजी राजेंचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर या ठिकाणी शिवनेरी गडावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाऊ यांच्या पोटी झाला. त्या काळात मुघल साम्राज्याने बऱ्यापैकी आपलं अस्तित्व निर्माण केलं होतं. अशा परिस्थितीत स्वराज्याचं स्वप्न जिजाऊ यांनी पाहिलं आणि शिवबाला त्या परीने घडविले. स्वराज्याचं बाळकडू जिजाऊ यांनी शिवरा...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे